शेतकऱ्यांना ज्यातून फायदा होतो त्यासाठी केंद्र सरकार (Central government) वेगवेगळ्या योजना राबवत असतात. दरम्यान मागील काही दिवसांपासून केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी (Farmer) पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) राबवत आहे. महत्वाची बाब म्हणजे या योजनेअंतर्गत सध्या देशातील लाखो शेतकरी फायदा घेत आहेत.
कसबा, चिंचवड निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या बड्या नेत्यामध्ये नाराजी?
आतापर्यंत पीएम किसान योजनेचे १२हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. शेतकरी आता १३व्या हप्त्याची वाट पहात होते. त्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी म्हत्वाची आहे. पीएम किसान योजनेचा १३वा हप्ता २७ फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १२व्या हप्त्याचे पैसे देण्यापूर्वी केंद्र सरकारने या योजनेत मोठा बदल (Big change in plan) केला आहे. मात्र, या बदलाचा करोडो लाभार्थ्यांना फटका बसला. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांना १२वा आणि १३वा हप्ता एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणारा आहे.
“…ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत? रोहित पवार यांचे ट्विट चर्चेत
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही. अशा शेतकऱ्यांना तेरावा हप्ता मिळणार नाही. माध्यमातील वृत्तानुसार, पीएम किसानची नोंदणी करणे शेतकऱ्यांना अनिवार्य आहे. बनावट कागदपत्रे दाखवून या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे मिळवले आहेत. या कारणामुळे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्यासाठी ई-केवायसी करावी लागणार आहे.
लाभार्थी स्थिती आणि पेमेंट तपशील असे तपासा –
1) सर्वप्रथम तुम्हाला pmkisan.gov.in वर जावे लागेल. त्यानंतर एक पेज ओपन होईल.
2) या पेजवर तुमचा पीएम योजनेत नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका.
3) कॅप्चा कोड एंटर करा.
4) पुढे मोबाईलवर मिळालेला OTP टाका आणि Get Details वर जा.
5) आता तुमचा नोंदणी क्रमांक आणि नाव स्क्रीनवर दिसेल.
पायात घालायला नाहीत शूज! अन् 15 वर्षांची मुलगी सुर्यकुमार यादवच्या